मुंबई : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असली तरी एक दिलासादायक बातमी असून महाराष्ट्रात मागील २४ तासांत डिस्चार्ज दिलेल्या ६ हजार ३६५ कोरोना रुग्णांसंह आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९३.४२ टक्के इतका झाला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
काल (ता. ०८) ४ हजार २६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे राज्यात ४७ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात आज 4026 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6365 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1737080 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73374 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.42% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 8, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५९ हजार ३६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५ लाखात ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात ४ हजार २६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ५९ हजार ३६७ इतकी झाली आहे.