तर आम्ही आरक्षणावरील हक्क सोडू : केंद्रिय मंत्री रामदास आठवले
राजकारण

तर आम्ही आरक्षणावरील हक्क सोडू : केंद्रिय मंत्री रामदास आठवले

कोल्हापूर : आम्ही आरक्षण सोडू असे वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आठवले म्हणाले, आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था बंद करावी. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत. आगामी जनगणना होत असताना त्यामध्ये जातनिहाय उल्लेख व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला इतर मागास वर्गीय प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. त्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग करावं. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही. त्यातील उपेक्षित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.