शेतकरी आंदोलन चिघळणार ! संत बाबा राम सिंह यांची गोळी झाडून आत्महत्या
देश बातमी

शेतकरी आंदोलन चिघळणार ! संत बाबा राम सिंह यांची गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन चिघळण्याची शक्यता दिसत असून आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एक चिठ्ठीदेखील लिहली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आत्महत्येनंतर समोर आलेल्या चिठ्ठीमध्ये संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. तो आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे, असं त्यांनी त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.

कोणीही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काही केलं नाही. अनेकांनी त्यांना मिळालेले सन्मान परत केले. हा अत्याचाराविरोधातील आवाज आहे. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह, असंही त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

कोण आहेत बाबा राम सिंह?
बाबा राम सिंह हे एक शेतकरी होते. ते हरयाणा एसजीपीसीचे नेते देखील होते आणि पहिल्यापासून ते शेतकऱ्यांसोबत आहेत.

शेतकरी आंदोलनाचा चौथा बळी
यापूर्वी मंगळवारीदेखील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर सोमवारी रात्री उशीरा पटियाला जिल्ह्याच्या सफेद गावात एक अपघात झाला होता. त्यामध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून परतत असेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संत बाबा राम सिंह यांचा शेतकरी आंदोलनातील चौथा बळी आहे.