लातूर : महाराष्ट्रीत ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. लातूरच्या दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढताना आम आदमी पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट रिट्विट करत थेट मराठीत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021
दरम्यान, सध्या सर्वच पक्ष आपण आघाडीवर असल्याचा दावा करत आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि भाजपामधील नेते किती जागांवर विजय मिळवला यावरुन दावे करत असताना दुसरीकडे आम आदमी पक्षाने विजय मिळवत खाते उघडलं असून आम आदमी पक्षासाठी ही चांगली सुरवात आहे,