राज्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिल्लीत
राजकारण

राज्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिल्लीत

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहित क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. आशिष देशमुख यांच्या या लेटरबॉम्बने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातील हा अंतर्गत वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे. क्रीडमंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आशिष देशमुखांच्या आरोपानंतर क्रीडामंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींची सुनील केदार भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आशिष देशमुखांनी केलेल्या गंभीर आरोपावर सुनील केदार हे पक्षश्रेष्ठींसमोर आपली बाजू मांडणार असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार केल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे.