पटोलेंचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘होय, माझ्यामुळेच तिथे काँग्रेसचा पराभव’
राजकारण

पटोलेंचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘होय, माझ्यामुळेच तिथे काँग्रेसचा पराभव’

अकोला : विदर्भासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजच्या दोन संचालकपदाच्या निवडणुकीचा ( Mahabeej Election Result ) निकाल २२ सप्टेंबरला जाहीर झाला. यामध्ये उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख विजयी झाले. तर विदर्भ मतदारसंघातून डॉ. रणजीत सपकाळ विजयी झालेय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले ( Nana Patole ) यांना महाबीजच्या निकालावर प्रश्न विचारला. त्यावर नाना पटोले यांनी धक्कादायक ( Congress News ) विधान केलं आहे. वाशिमच्या दौरावर असताना पटोले शनिवारी अकोल्यात थांबले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलंय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

होय, माझ्यामूळच ‘महाबीज’मध्ये काँग्रेसचा पराभव- पटोले

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजच्या दोन संचालकपदाच्या निवडणुकीचा निकाल २२ सप्टेंबरला लागला. यामध्ये उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख हे ९५३ बॅलेटमधून ५ हजार ६६६ मते घेऊन विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. विष्णुपंत सोळंके (बीड) यांना ५२८ बॅलेटमधून ३३०६ मते मिळाली. तर विदर्भ मतदारसंघातून डॉ. रणजीत सपकाळ यांना १३३९ बॅलेटमधून ८ हजार ९६२ मते मिळाली. त्यांचा दणदणीत विजय झाला. तर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत गावंडे यांना ३८० बॅलेटमधून २३२१ मते मिळाली. दरम्यान या निवडणुकीमध्ये विदर्भ मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांच्यासाठी अनेक मतदारांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी खुद्द फोनवर मतदान करण्यासाठी आग्रह केल्याचं समोर आलं होतं. दरम्यान जाहीर झालेल्या निकालामध्ये प्रशांत गावंडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. यासंदर्भात वाशिम दौऱ्यावर जात असताना नाना पटोले हे शनिवारी अकोल्यात थांबले होते. त्यावेळी त्यांना महाबीजच्या निकालावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पटोले यांनी धक्कादायक विधान केलं. होय!, मी जर फोन केला असता तर प्रशांत गावडे नक्कीच विजयी झाले असते, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.