वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन
राजकारण

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली : राज्यसभेत वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अध्यक्षांनी या सदस्यांना आपापल्या ठिकाणी परत जाण्याचे आणि कार्यवाही पुढे जाऊ देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सभासदांसमोर आलेल्या आणि फलक दाखवणाऱ्या सदस्यांची नावे नियम २५५ अन्वये प्रकाशित केली जातील आणि त्यांना दिवसभर निलंबित केले जाईल. तरी देखील गोंधळ थांबला नाही. त्यानंतर अध्यक्षांनी गोंधळ निर्माण करणाऱ्या सदस्यांना नियम २५५ अंतर्गत सभागृह सोडण्यास सांगितले.

या खासदारांचे झाले निलंबन
१) डोला सेन
२) नदिमुल हक
३) अर्पिता घोष
४) मौसम नूर
५) शांता छेत्री
६) अबीर रंजन बिस्वास