तर पाच वर्षात उत्तर प्रदेशात पाच मुख्यमंत्री अन् २० उपमुख्यमंत्री
राजकारण

तर पाच वर्षात उत्तर प्रदेशात पाच मुख्यमंत्री अन् २० उपमुख्यमंत्री

लखनौ : नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा असं काही वक्तव्य केलं आहे की ते चर्चेत आले आहेत. हरदोईमध्ये कार्यकर्ता सम्मेलनाला संबोधित करताना सुभासपाचे प्रमुख असणाऱ्या राजभार यांनी जर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचं सरकार आलं तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देतील आणि पाच वर्षाच पाच मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री बनवले जातील, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओम प्रकाश राजभार यांनी निषाद पक्षाचे संजय निषाद यांच्या मुलावरही टीका केली. तुम्ही भाजपकडे भीक का मागत आहात. त्याऐवजी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू. तसेच आता भाजपला मत देणारं कोणी शिल्लक राहीलं नसून सुभासपाचे सरकार बननण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही, असा विश्वासही राजभार यांनी व्यक्त केला. राजभार हे हरदोईमधील अतरौली क्षेत्रामध्ये सुभासपाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला हजर होते.

भाजपवर टीका करताना राजभर यांनी, उत्तर प्रदेशची जनता आता भाजपला कंटाळली आहे. सध्या भाजपला कोणी मतं देत नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळाले, असं म्हटलं आहे. राजभार यांनी निषाद पार्टीचे प्रमुख असणाऱ्या संजय निषाद यांच्यावरही शेलक्या शब्दांमध्ये टीका करत भाजपसोबत जाण्यासाठी ते एवढे लाचार का झालेत असा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीसाठी सुभासपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव यादव, प्रदेश महासचिव राममूर्ती अर्कवंशी, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र अर्कवंशी यांनीही उपस्थिती लावली होती.