विराट कोहलीच्या अटकेची मागणी… नेमकं काय घडलंय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
क्रीडा

विराट कोहलीच्या अटकेची मागणी… नेमकं काय घडलंय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली : विश्वचषक आता काही दिवसांवर आला असताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याची मागणी केली जात आहे. पण विराटने नेमकं असं केलंय तरी काय आणि त्याला अटक का करावी, या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्याच्या घडीला विराट चांगल्या फॉर्मात आहे. विराटचा बॅडपॅच संपलेला आहे आणि तो पुन्हा एकदा धावांचे इमले उभारतो आहे. पण ही गोष्ट एका बाजूला असली तरी विराटवर आता एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका चाहत्याच्या मृत्यूला कोहलीला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळेच कोहलीला अटक करण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय…
भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आहे आणि खेळाडू म्हणजे देव. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूला जर कोणी काही बोललं तर त्याचा जीव घ्यायलाही चाहते कमी करत नाहीत. पी विघ्नेश आणि एस धर्मराज या दोन मित्रांमध्ये हा वाद झाला. पी विघ्नेश हा रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच चाहता आहे, तर धर्मराज हा विराट कोहली आणि आरसीबीचा चाहता होता. धर्मराज आणि विघ्नेश यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर धर्मराजने चक्क विघ्नेशचा जीव घेतला. हा क्रुरतेचा कळस असला तरी त्यानंतर ही गोष्ट थांबलेली नाही. कारण त्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी आता अजब मागणी केली आहे. सोशल मीडियावर रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. यावेळी त्यांनी या सर्व गोष्टीला विराट कोहलीला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता विराट कोहलीला अटक करा, अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. ही गोष्ट घडली आहे ती तामिळनाडूमध्ये. पण या गोष्टीचे पडसाद आता संपूरण जगभरात उमटले आहेत. कारण सोशल मीडियावर आता Arrest Kohli हा ट्रेंड तयार झाला आहे आणि तो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

https://twitter.com/VinaySh64568416/status/1581088589156585473

एका चाहत्याने जर दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतला तर त्यामध्ये खरंच खेळाडूची चूक कशी असेल, असेही आता म्हटले जात आहे. चाहते हे कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही. पण त्यासाठी ते ज्यांना आदर्श मानतात त्याला खेळाडूला अटक करण्यात काय तर्क आहे, हे मात्र अजूनही समजलेले नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलेली मागणी हे किती चुकीची आहे, हे आता समोर आले आहे.