चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील आगामी दोन कसोटींसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांना संघात न घेता उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, पहिल्या दोन सामन्यांसाठी चमूत असणाऱ्या मराठमोळ्या शार्दुलला संघाबाहेर करण्यात आलं. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
आगामी दोन कसोटी संघासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
#TeamIndia for last Two Tests against England announced.@Paytm #INDvENG
— BCCI (@BCCI) February 17, 2021
वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त होता. तो थेट अहमदाबादमध्ये संघात दाखल होणार आहे. निवड समितीने पाच नेटमधील गोलंदाज आणि दोन राखीव खेळाडूदेखील घेतले आहेत. अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार हे नेटमधील गोलंदाज आहेत तर केएस भरत आणि राहुल चहर हे राखीव खेळाडू असणार आहेत.