अहमदाबाद : इंडियन प्रिमीयर लिगमध्ये आता दोन संघाचीा वाढ झाली असून आयपीएलमध्ये आता ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI)ची 89वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. २४) अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीमध्ये आयपीएलमध्ये मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
🚨 BREAKING 🚨
BCCI gives in-principle approval for a 10-team #IPL starting from the 2022 season.
The IPL Governing Council has been asked to work out details of expansion and get back #BCCIAGM pic.twitter.com/1uDY4IM75l
— Cricbuzz (@cricbuzz) December 24, 2020
आयपीएल २०२१ मध्ये आणखी दोन टीम वाढतील आणि एकूण टीमची संख्या १० होईल, अशी शक्यता होती. पण आता बीसीसीआयने दोन नवीन टीम आणण्याचा निर्णय सध्या पुढे ढकलला असून पुढील वर्षी ८, मात्र २०२२मध्ये १० संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.