भारत-इंग्लंड महिला कसोटी : राणाच्या अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत
क्रीडा

भारत-इंग्लंड महिला कसोटी : राणाच्या अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत

ब्रिस्टल : स्नेह राणाच्या झुंजार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर फॉलोऑनंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८०) तानिया भाटियाच्या साथीने नवव्या गडय़ासाठी १०४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १२१ षटकांत ८ बाद ३४४ धावा करता आल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाटियाने नाबाद ४४ धावा केल्या. त्याआधी सलग दुसरे अर्धशतक झळकावणारी शेफाली वर्मा ६३ धावांवर बाद झाल्यानंतर दीप्तीने पूनम राऊतसह (३९) तिसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी केली. पण सोफी एस्सेलस्टोनने दीप्तीचा (५४) अडसर दूर केल्यानंतर कर्णधार मिताली राज (४) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (८) यांनी निराशा केली.

संक्षिप्त धावफलक
नाणेफेक – इंग्लंड (फलंदाजी)
इंग्लंड पहिला डाव – ३९६ ९ (डाव घोषित)
भारत पहिला डाव – २३१/१०
भारत दुसरा डाव (फॉलोऑन) – ३४४/८ (सामना अनिर्णित)