पंढरपूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारलेली आहे. तर , राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज (ता. ०३) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं आहे. त्यानंतर या […]
महाराष्ट्र
महाराष्ट्राने केली केंद्राकडे अधिकच्या एवढ्या लसींची मागणी
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लसींचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने अखंडित […]
वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडून मृत्यू
पुणे : वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. मागील आठवड्यात वाढदिवस झाल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन म्हणून पिंपरी चिंचवडमधील पाच मित्र लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. तेव्हा, ही दुर्दैवी घटना घडली असून यात खाणीत बुडून वाढदिवस वाढदिवस झालेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र […]
ईडीची कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त
मुंबई : ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकांचा आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे अजित पवारांना मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. जरंडेश्वर […]
गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं […]
धक्कादायक ! शिवसेना नेत्याची मिरचीपूड टाकून हत्या
अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा बसस्थानकाजवळ बारसमोर शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल पाटील (३८ वर्षे) यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून पाच जणांनी हत्या केली. शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप रामदास ढोबाळे (४२), प्रवीण रामदास ढोबाळे (४०), प्रवीण ऊर्फ अविनाश एकनाथ पांडे […]
सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्के बालकांत आढळल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज
मुंबई : एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचा ट्रेंड दिसत असताना दुसरीकडे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या Delta आणि Delta Plus या व्हेरिएंट्समुळे देखील सरकारची, प्रशासनाची आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे. मुंबईत अजूनही कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसताना एक नवी चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेमध्ये शहरातल्या तब्बल […]
मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक
मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. ईडीच्या […]
सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल; सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम
मुंबई : सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आले असून सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ […]
अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या […]