मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोणी करायला हवं? असा प्रश्न शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना केला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नाही का जो पक्षाचं नेतृत्व करेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, हा प्रश्न आपण भाजपबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचं सांगत […]
राजकारण
मिस्टर बिन आता दिसणार नाही; वाढदिवसादिवशी मोठी घोषणा
मुंबई : कॉमेडियन, लेखक, सिटकॉम मिस्टर बीन रोवन एटकिंसनचा आज जन्मदिन आहे. जगभरात रोवनला नावाने कमी आणि ‘मिस्टर बीन’ नावाने जास्त ओळखलं जातं. एटकिंसनला जरी मिस्टर बीन नावाने ओळखलं जात. असं असलं तरीही एटकिंसनचं म्हणणं आहे की, ‘हे पात्र अतिशय तणावपूर्व आणि थकवणारं आहे. आता मिस्टर बिनचं कॅरेक्टर साकारायला मजा येत नाही. कारण, हे पात्र […]
मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ टॅगलाईनवर भाजपाची टीका
मुंबई : मुंबई महानगरापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे म्हणत गुजराती मतदारांना साद घातली. त्यानंतर या प्रकारावरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणी केली. भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य […]
प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी
देहरादून : उत्तराखंडच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मध्यरात्री ट्विट करून काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांची माफी मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची ह्रदयेश यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी भीमताल दौऱ्यात असताना विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांच्यावर निशाणा साधला होता. टीका […]
तेव्हा ब्रिटीशांनी मारले आणि आता मोदी सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. ”आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. असे शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे. पण भाजपचे मोदी सरकार अहंकाराने पेटले आहे. कडाक्याच्या थंडीत, मुसळधार पावसातही शेतकरी पेटून उठला आहे. हे असे प्रेरणादायी चित्र स्वातंत्र्यपूर्व काळातही दिसले […]
ममता बॅनर्जींना झटका; आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एकामागोमाग हादरे बसताना दिसत आहेत. अनेकांनी याआधीच पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली असताना, क्रीडामंत्री व माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी मंत्रीपदाचा जरी राजीनामा दिला असला, तरी ते अद्याप टीएमसीचेच […]
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर; भाजपाचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार?
नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक मालापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा हा दौरा असून यावेळी नाशिक भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे भाजपचे हे दोन बडे नेते कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांनी […]
उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल
मुंबई : “नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल.” असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल आहे. आज पहाटे चार वाजताच रोहित पवार मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी माथाडी […]
बाळासाहेब थोरात सोडणार प्रदेशाध्यक्षपद; प्रदेशाध्यपदासाठी ‘या’ नावांची चर्चा
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती काँग्रेसममधील काही नेत्यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर या पदासाठी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती […]
भाजपा-मनसेची युती होणार? भाजपाने दिले ‘हे’ उत्तर
मुंबई : जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा एकत्र लढणार आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र, दोन्ही पक्षांकडून यावर अद्याप अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलेली […]