मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ टॅगलाईनवर भाजपाची टीका
राजकारण

मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ टॅगलाईनवर भाजपाची टीका

मुंबई : मुंबई महानगरापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे म्हणत गुजराती मतदारांना साद घातली. त्यानंतर या प्रकारावरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणी केली. भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ‘कोकण म्हणजे आम्हीच, असा अहंकार असणाऱ्या पक्षाचे वस्त्रहरण सुरु झाले आहे, असे म्हणत त्यांनी कोकणातील मतदारांना गृहीत धरण्याच्या शिवसेनेच्या वृत्तीवर त्यांनी ताशेरे ओढले.

तसेच, यावेळी शेलार यांनी शिवसेनेच्या ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या नव्या टॅगलाईनविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर आशिष शेलार यांनी, मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणीही केली आहे.

त्याचबरोबर, राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे 12 नेते राज्यभरात दौरे करणार आहेत. भाजपच्या मंगळवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही महाविकासआघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ. रोज सरकार पडणार म्हणून ओरडायचे आणि फोडाफोडी करायची, हे दुबळ्यांचे राजकारण आहे. तरीही नवी मुंबईत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा शेलार यांनी केला होता.

तर , महाविकासआघाडी सरकारमध्ये सकाळ-संध्याकाळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून लाथाबुक्क्या खाणे एवढेच काम आता काँग्रेसला उरले आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्षाचे विघटन होण्याचा धोका आहे. आता हे विघटन शिवसेनेमुळे होतंय का, याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.