नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रनौत आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्यातील शब्दांचे ट्विटर युद्ध अद्यापही सुरूच आहे. आता यावेळी कंगनाने यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान दिलजित परदेशात जाऊन सुट्टी एन्जॉय करत असल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवर विदेशातून त्याचे चार छायाचित्रे पोस्ट केल्यानंतर कंगनाने दिलजितवर हा आरोप करत त्याच्यावर निशाणा साधला आहे. मात्र दिलजितनेही कंगनाच्या टीकेला तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दिलजीतच्या छायाचित्र शेअर करत कंगनाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ”वाह माझ्या भावा! स्थानिक क्रांतिकारक देशाला आग लावून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून परदेशात थंडीचा आनंद घेत आहेत. व्वा! याला स्थानिक क्रांती म्हणतात. मात्र कंगनाच्या या ट्विटला उत्तर देताना दिलजितने लिहिले आहे की, ‘हिला शेतकर्यांशी काय समस्या आहे हेच मला समजत नाही? मॅडम, संपूर्ण पंजाब शेतकर्यांच्या पाठीशी आहे, तुम्ही ट्विटर अकाऊंटवर आयुष्य जगत आहात. कोणीही तुमच्याबद्दल बोलत नाही.
Mainu Eh SAMJH Ni Aundi ke Enu Kisan’an Ton Ki Prob. aa?
Madam Ji Sara PUNJAB HEE KISAN’AN DE NAAL AA.. Tusi Twitter te Bhulekhe Ch Zindagi Jee Rahe Hon..
TERI TAN KOI GAL V NI KAR RIHA..
Akhey “ SADDI NA BULAI MAI LAADEY DI TAEE”
OH HISAAB TERA AA.. https://t.co/QTUXjsJj9E
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) January 4, 2021
त्याला उत्तर म्हणून कंगनाने लिहिले, शेतकऱ्यांच्या हाक्कासाठी कोण लढले आणि कोण त्यांच्या विरोधात लढले हे वेळच सांगेल मित्रा. शंभर खोटे बोलण्याने एक सत्य लपू शकत नाही. आणि जे मानावासून आवडते ते तुमचा कधीही तिरस्कार करू शकत नाही. तुला काय वाटते, तुझ्या बोलण्याने पंजाब माझ्या विरोधात असेल? हाहा … इतके मोठे स्वप्न पाहू नकोस, तुझे हृदय तुटेल.” असेही कंगनाने म्हंटले आहे.
तर दिलजीतने वेळ व्यर्थ न घालव ता आपल्या शैलीत कंगनाच्या ट्वीटला उत्तर दिले आहे, हिला मी माझा पीआर म्हणूनच ठेवायला हवे. हिच्या डोक्यातून मी जातच नाही.” असेही दिलजितने म्हंटले आहे. तथापि, दिलजितने त्या ट्वीटसोबत एक लेख शेअर केला आहे. कंगनाच्या डोक्यातून मी जातच नाही. त्यामुळे तिला माझा पीआर प्रतिनिधी म्हणून नियुक्त करायला हवे. असे त्याने गमतीने म्हंटले असे या लेखात म्हंटले आहे.