देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल शेवट?
मनोरंजन

देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल शेवट?

मुंबई : झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस ही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या मालिकेच्या निमित्ताने अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यात लागीरं झालं जी अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत आहे. किरणची मालिकेतील देवीसिंगची भूमिका विशेष गाजत आहे. पण आता मालिकेचा शेवट होणार का? कसा असणार? देवीसिंगविषयी पोलिसांना सत्य कळणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

अजितकुमार हाच देवीसिंग असल्याचे पोलिसांना कळते का? हे दोन तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील सुरु आजी, डिंपल, टोण्या, बाज्या. विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉक्टर अमित कुमार अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.