ट्रक-मिनीबसचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू
देश बातमी

ट्रक-मिनीबसचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू

हैद्राबाद : चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या मिनीबस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १३ जण जागीच ठार झाले आहेत. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत अन्य चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिनी बसमधून चित्तूर जिल्ह्याकडून हैद्राबादच्या दिशेने जात होता. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. बस आधी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडर तोडून बस ट्रकवर जाऊन आदळली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्यानं या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अपघातात मरण पावलेल्यांमध्ये मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. अपघातात मरण पावलेल्यांविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.