मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…
देश बातमी

मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…

भोपाळ : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून वाढवून २१ वर्षांपर्यंत वाढविण्याबाबत चर्चा व्हायला हवी. अनेकदा मला वाटते की, समाजामध्ये मुलींच्या विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याबाबत चर्चा व्हायला हवी. मी याला चर्चेचा मुद्दा बनवू इच्छितो. राज्य आणि देशाने यावर विचार करावा, म्हणजे यावर काही निर्णय घेता येईल, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले होते.असे विधान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र चौहान यांच्या या मतावर टीका करताना काँग्रेसचे नेते सज्जन सिंह वर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. ”डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे. आधीच विवाहाचे वय १८ निश्चित केले आसताना ते वय तेवढेच का राहू दिले जाऊ नये, असे विधान सज्जन सिंह वर्मा यांनी केले आहे.

विशेष बाब म्हणजे राज्यस्तरीय सन्मान अभियानाची सुरुवात करताना त्यांनी हे विधान केले होते. या अभियानाचा उद्देश महिलांविरोधातील गुन्ह्यांचे निर्मुलन करण्यासाठी समाजाची सक्रिया भागिदारी निश्चित करणे, महिला आणि मुलींसाठी सन्मानजनक आणि अनुकूल वातावरण तयार करणे आणि सर्वसामान्य लोकांसाठी कायदेशीर तरतुदींबाबत जागरुक करण्याचे आहे. मध्य प्रदेशमध्ये गुन्हेगारांवर अंकुश लावण्याचे कार्य पूर्ण क्षमतेने केले जाईल. सर्वसामान्यांना कायद्याच्या राज्याची जाणीव करून दिली जाईल, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.