उत्तरप्रदेशातील जोडप्याचं दिल्लीतून अपहरण; मध्यप्रदेशात हत्या अन् फेकलं वेगवेगळ्या राज्यात
देश बातमी

उत्तरप्रदेशातील जोडप्याचं दिल्लीतून अपहरण; मध्यप्रदेशात हत्या अन् फेकलं वेगवेगळ्या राज्यात

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील एका जोडप्याचं दिल्लीतून अपहरण करुन मध्यप्रदेशात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह मध्यप्रदेशात फेकून मुलाचा मृतदेह राजस्थानमध्ये फेकण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मृतदेह मिळाल्याच्या ४२ दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेजारी राहणाऱ्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांच्या त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दोघांना घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी अल्पवयीन होती. सर्वात प्रथम हे जोडपं दिल्लीत असल्याचं कुटुंबियांना कळलं. त्यानंतर त्यांची मध्य प्रदेशातील भिंडमध्ये नेलं. त्यानंतर भिंड येथून ग्वाल्हेरला गेले आणि वाटेतच त्यांची हत्या केली. त्यांची नुसती हत्या करून थांबले नाहीत. चाकूने गुप्तांगावर वार केले. अत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाशीकडे जाणाऱ्या महामार्गावर त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांना मुलीचा मृतदेह धोलपूर परिसरात आढळून आला. पिवळ्या प्लास्टिक दोरीचा वापर करून मुलीला गळा आवळून मारल्याचं समोर आलं.

यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिग एक्सपर्टची मदत घेतली. त्यात युवकाचं गुप्तांग कापल्याचं समोर आलं. मात्र मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होती. दरम्यान उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील सिरसागंज पोलीस ठाण्यातील पोलीस ग्वालियरला आले. त्यानंतर मृतदेह जहांगीरपूरमधील २० वर्षीय उत्तम सिंह यादव याचा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवलं. संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी दोघांची हत्या केल्याचं कबुल केलं.