राज्यात आजही ४७ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आजही ४७ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित

मुंबई : ऱाज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात एकूणच कोरोनाचा उद्रेक झाल्याचा पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आज राज्यात २६ हजार २५२ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५ हजार ४९ हजार ०७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ०७ लाख १५ हजार ७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३० लाक ५७ हजार ८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाक १६ हजार ९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २० हजार ११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.