देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रात

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केरळचे १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजीपणाने कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे धोकादायक ठरणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या आठवड्यात भारतात आढळून आलेल्या कोरोना बाधितांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३ टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले आहेत. कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याचे केंद्राने शुक्रवारी सांगितले. देश अजूनही दुसर्‍या लाटेसोबत लढत आहे आणि आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण आपल्याला वाटत आहेत की कोविड-१९ संपला आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकारने पर्यटन स्थळावर होत असलेल्या गर्दीबाबतही भाष्य केलं आहे. पर्यटन स्थळावरील परिस्थिती पाहून लोकं कोविड प्रोटोकॉलचे नियम पाळत नसल्याने हे चिंतेचे एक गंभीर कारण आहे आणि त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका वाढेल असे, असे सरकारने म्हटले आहे.