शेतकरी आंदोलन; शेतकरी आंदोलकांचा १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा निर्णय
देश बातमी

शेतकरी आंदोलन; शेतकरी आंदोलकांचा १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा निर्णय

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत आज शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२ ते ४ असे चार तास हे आंदोलन केलं जाणार आहे. १४ फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याचबरोबर शेतकरी आंदोलकांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अजून आक्रमक करणार आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी १२ फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, “कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडई, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषवरील चर्चेदरम्यान केलं. यानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

इतकेच नव्हे तर, “आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीची माहिती आणि अफवांना बळी पडले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.