संयुक्त महाराष्ट्रासंबंधी पंतप्रधान मोदींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मागणी
राजकारण

संयुक्त महाराष्ट्रासंबंधी पंतप्रधान मोदींकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी मागणी

मुंबई : सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होत आहे. तो अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावीत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर असल्याचेही अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.