त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय; राममंदिर वर्गणीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
राजकारण

त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय; राममंदिर वर्गणीच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

मुंबई : “राम मंदिर आंदोलनात ज्यांनी केवळ राजकीय घुसखोरी केली त्यांनाच रामवर्गणीची पोटदुखी होतेय”, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राम मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. वर्गणी जमा करण्याच्याचे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे.” अशा शब्दात राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून जमा केल्या जाणाऱ्या वर्गणीवरुन शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ”

याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे. “राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधु ते कारसेवक किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत”, असं ट्विट शेलार यांनी केलं.

तसेच, “या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी, त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय ” रामवर्गणी”. राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवण्यांना स्वत:च्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?”, असा जोरदार टोलाही त्यांनी शिव्सेनेला हाणला आहे.