नारायण राणेंच्या जीवाला धोका; भाजपला भिती
राजकारण

नारायण राणेंच्या जीवाला धोका; भाजपला भिती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेपूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नारायण राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र ही अटक झाल्यानंतर भाजपनेते प्रसाद लाड यांनी अनेक गंभीर आरोप केले असून राणेंच्या जीवाला धोका असल्याची भाजपला भीती वाटत आहे असं लाड म्हणाले आहेत. राणे यांना अटक केल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत पोलीस स्थानकामध्येच बाचाबाची झाली. कुठल्या गुन्ह्याखाली अटक केली आहे हे जाणून घेण्याचा हक्क आहे की नाही, असा प्रश्न निलेश राणे यांनी पोलिसांना विचारला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लाड यांनी, एसपी बोलायला तयार नाहीयत. दरवाजा बंद करुन बसलेत. आम्हाला अशी भीती आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे. राणेंना असच ताटकळत ठेऊन त्यांना न्यायालयासमोर न नेता त्यांना अटक करुन रात्री त्यांचा छळकरायचा हा देखील या सरकारचा प्रयत्न असू शकतो, असं म्हटलं आहे.

याच प्रमाणे पत्रकारांनी आरोग्यासंदर्भातील कारण अटक टाळण्यासाठी देण्यात आलं का असा प्रश्न लाड यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, मेडिकलचं कारण पुढे केलेलं नाही. त्यांचं वय ७० आहे. राज्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला अशी वागणूक मिळणार असेल तर ते निंदनीय आहे. राज्य कुठल्या स्थरावर जातंय याचाही विचार करावा लागेल, असं लाड म्हणाले.