महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा; भाजपा नेत्याचा हल्लाबोल
राजकारण

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा; भाजपा नेत्याचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं, आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते साफ खोटं आहे, आफ्रिकेतून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा अशा भाषेत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता ठाकरे सरकारची डोकेदुखीसुद्धा वाढली आहे. यातच जर लोकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२१) मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले आहेत. लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ”मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण होते, लसीकरणात महाराष्ट्राचा नंबर देशात सर्वात शेवटचा का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, संचारबंदी आणि लॉकडाऊन असे इशारे देऊन काही फायदा होणार नाही, स्वतःच्या अपयशाबद्दल जनतेला दोष देऊ नका, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

तसेच, देशातून साऊथ आफ्रिकेत पाठवलेल्या कोरोना लसींचे डोस पुन्हा भारतात पाठवण्यात आले आहेत, या लसीचे डोस देशासाठी उपयोगी ठरतील, तसेच आणखी काही डोस राज्याला मिळणार आहेत, त्यामुळे ते डोस मिळाल्यावर सामान्य नागरिकांना लसीकरण करण्यात येईल.