मोदींनी निवडलेल्या कर्तृत्ववान लोकांत राणेंना संधी
राजकारण

मोदींनी निवडलेल्या कर्तृत्ववान लोकांत राणेंना संधी

नवी दिल्ली : बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. मोदींनी निवडलेल्या कर्तृत्ववान लोकांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांना संधी मिळाली असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करुन यात्रेला केली. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद मिळालेला आहे. तसंही राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही. वरुण राजाच्या आशिर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनाचा आशिर्वाद घेऊन मोदीजींच्याप्रति कृतज्ञता प्रगट करुन ही यात्रा जाणार आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ८० टक्के उद्योग हे राणे यांच्या खात्याअंतर्गत येतात, देशाचा जीडीपी हा विभाग ठरवतो. महाराष्ट्रमध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे हे मी सांगण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र गेल्या ५ वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचे राज्य झालं होतं. पण गेल्या २ वर्षामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि बाकीची राज्ये पुढे चालली आहेत. असेही फडणवीस म्हणाले.