ज्यांच्यात गोडसे, सावरकरांचा DNA, त्यांनाच शेतकऱ्यांमध्ये देशद्रोही दिसतात
राजकारण

ज्यांच्यात गोडसे, सावरकरांचा DNA, त्यांनाच शेतकऱ्यांमध्ये देशद्रोही दिसतात

नवी दिल्ली : ”ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात” अशी घणाघाती टीका समाजवादी पार्टीचे सुनील सिंह साजन यांनी केली आहे. दिल्लीतील शेतकरी आपल्या रास्त मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्यापही केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यासाठी तयार नाहीत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाने भारत बंदही पाळला होता. या बंदला विविध देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. काही सत्ताधारी नेत्यांनी तर या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी आणि देशद्रोही घुसले असल्याचाही आरोप केला आहे. त्या आरोपांना समाजवादी पक्षाने सडेतोड उत्तर दिले आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तर समाजवादी पार्टीने शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ”’समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील’ सुनील सिंह साजन यांनी उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यात आणि शहरात पक्ष कार्यालयात आमचे कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत निषेध नोंदवतील. सरकारला जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील, असं म्हटलं आहे.

तसेच, अखिलेश यादव यांनी ठरवलं आहे की, ” शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गावोगावी फिरून कायद्याविरोधात निषेध नोंदवायचा आहे. यामध्ये आमच्या विरोधात कितीही खटले दाखल झाले तरीही आम्ही थांबणार नाही. आम्हाला तुरुंगात टाक्ले, किंवा आंदोलन दडपण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करण्यात आला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. शेवटपर्यंत समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहील” असं देखील साजन यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे.