म्हणून राहुल गांधी पदेशात गेले आहेत; कॉंग्रेस नेत्याने सांगितले कारण
राजकारण

म्हणून राहुल गांधी पदेशात गेले आहेत; कॉंग्रेस नेत्याने सांगितले कारण

नवी दिल्ली : ”जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते इटलीला गेले आहेत”. असा खुलासा काँग्रेस नेते राजीव सातव यांनी केला आहे. तसेच, शेतकऱ्यांना आपली दिशाभूल करुन घेऊ नका असं आवाहन केलं आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि दुसरीकडे कॉंग्रेसचा वर्धापन दिन असताना कॉंग्रेस खासदर राहुल गांधी परदेशात निघून गेल्यामुळे भाजपा नेते राहुल गांधीच्या परदेश दौऱ्यावर टीका करत आहेत. तर काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजीव सातव म्हणाले की, मोदींनी गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेची वाट लावली. लाखो शेतकरी रस्त्यावर बसले आहेत त्याबद्दल एक शब्द तुम्ही बोलत नाही. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात त्याची चर्चा करायला तयार नाही. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यातच कोरोनाचं भयंकर मोठं संकट येणार असल्याचं केंद्र सरकारला सांगितलं होतं. मात्र सरकारने लक्ष दिलं नाही. लाखो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असताना सरकार लक्ष द्यायला तयार आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

सातव पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी गेल्या सहा वर्षापासून एकही पत्रकार परिषद घेण्यास तयार नाहीत. त्यावर तर कोणी बोलत नाही. देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने कधी उत्तर दिलं नाही. त्यावर ज्या एकमेव नेत्याने संघर्ष केला आहे ते म्हणजे राहुल गांधी आहेत,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ते म्हणाले की, “भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांना ईडीच्या नोटीस येतात. अतापर्यंत भाजपाच्या एका नेत्यालाही नोटीस आलेली नाही. इतिहास पाहिला तर संजय राऊत, एकनाथ खडसे, शरद पवार यांना नोटीस आली आहे. ईडी, सीबीआयने आपलं ऑफिस भाजपाच्या कार्यालयात शिफ्ट करावं म्हणजे चर्चेत वेळ जाणार नाही”.