सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा; मुंबईत स्वागत आहे, मात्र…
राजकारण

सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा; मुंबईत स्वागत आहे, मात्र…

मुंबई : ”उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे,’ असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी टीव्ही 9 शी संवाद साधला. उद्या डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील. असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संप्टेबरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली होती. फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,” अशा सांगत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला असून शंका व्यक्त केली आहे.