पटना : लोक जनशक्ती पार्टीमध्ये राजकीय संकट आणखी तीव्र झाल्यानंतर आगामी काळात बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या संघर्षात इतर राजकीय पक्षदेखील संधी साधत आहेत. यात राष्ट्रीय जनता दलही मागे नाही. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी चिराग यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडून त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याने बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होणार का? याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
तेजस्वी यांनी यावेळी त्यांनी चिराग पासवान यांना २०१० मध्ये जेव्हा एलजेपी जवळ खासदार आणि आमदार नव्हते तेव्हा लालु प्रसाद यांनी रामविलास पासवान यांना मदत करत राज्य सभेत पाठविल्याचे लक्षात आणून दिले आहे. तेजस्वी म्हणाले, चिराग पासवान यांनी विचार करावा की ते गुरु गोळवलकरांच्या विचारांचे अनुसरण करणाऱ्यांबरोबरच राहतील की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकरांच्या अनुयायांसोबत जातील.
दरम्यान तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याववर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, नितीशकुमार यांच्या अज्ञानामुळेच आज बिहार या परिस्थितीत आला आहे. राज्यात बेरोजगारी आणि दारिद्र्य आहे.