नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशु पांड्या यांचं निधन झाले. आज (ता. १६) शनिवारी त्यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
हार्दिक पांड्याचा भाऊ बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.
बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआयशी बोलताना शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही. याबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य क्रिकेटपटूंकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
Heartbroken to hear about the demise of Hardik and Krunal's dad. Spoke to him a couple of times, looked a joyful and full of life person. May his soul rest in peace. Stay strong you two. @hardikpandya7 @krunalpandya24
— Virat Kohli (@imVkohli) January 16, 2021