धक्कादायक! भारतीय संघातील ९ खेळाडू आऊट; ५ नेट बॉलर्सना मिळणार संधी
क्रीडा

धक्कादायक! भारतीय संघातील ९ खेळाडू आऊट; ५ नेट बॉलर्सना मिळणार संधी

कोलंबो : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या टी-२० सामन्यावरचं संकट दूर झालं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बुधवारी ८ वाजता दुसरी टी-२० मॅच सुरू होणार आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता आज हा सामना होणार असला तरी कृणाल पांड्यासह ९ खेळाडू टी-२० सीरिजमधून बाहेर झाले आहेत, तर ५ नेट बॉलर्सना टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. इशान पोरेल, संदीप वॉरियर, साई किशोर, अर्शदीप सिंग आणि सिमरजीत सिंग यांना नेट बॉलर म्हणून श्रीलंकेला नेण्यात आलं होतं, पण आता त्यांना भारतीय टीममध्ये स्थान मिळालं आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार दुसऱ्या टी-20 मध्ये शिखर धवनच टीम इंडियाचं नेतृत्व करेल, पण ९ खेळाडू बाहेर झाले आहे. या ९ खेळाडूंमध्ये कोणाचं नाव आहे, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन आता टी-२० सीरिज खेळणार नाहीत. शिखर धवनही टी-२० सीरिजमधून बाहेर झाला आहे आणि भुवनेश्वर कुमार टीमचं नेतृत्व करेल, असं वृत्त होतं, पण शिखर धवन बुधवार आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.