सिडनी : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने अखेरच्या सामन्यात शेवटच्या षटकात दमदार विजय मिळवला आहे. मात्र सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने याआधीच खिशात घातली होती.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
India beat Australia by 1️⃣3️⃣ runs!
They have grabbed their first points in the ICC Men's @cricketworldcup Super League table 📈 👏 #AUSvIND 👉 https://t.co/UpvjQhWPfW pic.twitter.com/uAhUt8fL5k
— ICC (@ICC) December 2, 2020
शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात १३ धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले.
३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. लाबुशेन नटराजनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर शार्दुल ठाकूरने स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत कांगारुंची मैदानावर जम बसू पाहत असलेली जोडी फोडली. दोन सामन्यांत शतक झळकावणारा स्मिथ अखेरच्या वन-डेत ७ धावां काढून माघारी परतला. यानंतर हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात दोघांना यश येतंय असं दिसत असतानाच विराटने पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरकडे चेंडू दिला. शार्दुलनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता हेन्रिकेजला माघारी धाडत टीम इंडियाला महत्वाचा बळी मिळवून दिला.