सिडनी : अखेरच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १२ धावांनी मात करत व्हाईटवॉशपासून आपला बचाव केला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७५ धावांपर्यंत मजल मारु शकला. सामना संपल्यानंतर विराटने भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
विराट कोहली म्हणाला, ‘एका क्षणाला ज्यावेळी हार्दिकने फटकेबाजीला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही सांना जिंकू. पण मधल्या षटकांमध्ये ज्या पद्धतीने विकेट पडल्या त्याचा आम्हाला फटका बसला. हार्दिकसोबत आणखी ३० धावांची भागीदारी झाली असती तर सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं, असेही विराटने सांगितले.
कोहलीने ८५ धावांची खेळी करत चांगली लढत दिली, पण त्याचे प्रयत्नही तोकडे पडले. विराट कोहली आणि हार्दिक मैदानावर असताना एका क्षणाला भारत सामन्यात बाजी मारेल असं वाटत होतं, परंतू ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत सामन्याचं भारतावर अंकुश लावत सामन्यात बाजी मारली. दरम्यान, टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघासमोर ४ कसोटी सामन्यांचं आव्हान असणार आहे. १७ डिसेंबरपासून अॅडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना रंगणार आहे.