INDvsAUS : पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची भारताला सुवर्णसंधी
क्रीडा

INDvsAUS : पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची भारताला सुवर्णसंधी

सिडनी : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये दुसरा टी-२० सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताला पाकिस्तानचा सलग विजयाचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं पहिला सामना जिंकत पाकस्तान संघाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. २०१८ मध्ये पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकत हा कारनामा केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघातील महत्वाचे खेळाडू अनुपस्थित आहेत. याचा फायदा घेत भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल यात शंका नाही. आज, सिडनी येथील दुसरा टी-२० सामन्यात भारतीय संघानं जिंकल्यास लागोपाठ १० आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होईल. जुलै २०१८ मध्ये पाकिस्ताननं तिरंगी मालिकेत आधी झिम्बाब्वेला आणि मग ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केलं होतं. यानंतर युएईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला तीन-तीन वेळा पराभवा स्विकारावा लागला. कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं पाकिस्तानच्या या विक्रमाशी बरोबरी केली. आता दुसरा सामना जिंकत भारतीय संघ नवीन विक्रम करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले. टी-२० मध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आफगाणिस्तान संघाच्या नावावर आहे. आफगाणिस्ताननं २०१८-१९ मध्ये लागोपाठ १२ सामने जिंकले होते.

२०१९ मध्ये भारतानं विडिंजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला श्रीलंकाविरोधात टी-२० मालिका पार पडली होती. यात पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात भारतानं विजय संपादन केला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लागोपाठ पाच टी-२० सामने जिंकले होते.