नागपूर : जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला महाविकास आघाडी सरकारने मोठा दणका दिला आहे. काटोलच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांना नगरविकास विभागानं अपात्र घोषित केलं आहे. गुंठेवाडी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष आणि गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलचे नियमबाह्य आणि निकृष्ट बांधकाम केलं आहे. त्या कामाच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना काम दिल्याप्रकरणी […]
Author: ई-चावडी टीम
कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा; हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….
मुंबई : ‘हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना […]
सर रविंद्र जाडेजाने तोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने जाडेजाने 44 धावा चोपल्या. भारताला पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून देण्यात जडेजाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाने धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. […]
भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर
सिडनी : भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून मालिकेतून भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा संघाबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केल्यानंतर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. पहिल्या सामन्यात नाबाद ४४ धावांची खेळी करुन टीम इंडियाला १६१ धावांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडून देण्यास रविंद्र जाडेजाने मदत केली होती. पहिल्या टी-२० सामन्यात […]
भाजपाची एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना
मुंबई : ”आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे.” असं म्हणत शिवसेनेने भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मात्र विरोधी पक्षाने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. […]
निलेश राणेंनी काढली अजित पवारांची लाज
मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे सातत्याने वादग्रस्त ट्विट करत असतात. आता अशाच एका ट्विटमुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी ट्विटमधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाज काढली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकासआघाडीने मोठा विजय मिळवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन […]
हैद्राबाद निवडणुकीचे निकाल आले; एमआयमला जोरदार झटका, तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट
हैद्राबाद : एमआयएम आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या हैद्राबादमधील महानगरपालिकेच्या निवडणूकीत एमआयएमला जोरदार झटका बसला असून त्यांची तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट झाली आहे. हैद्राबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस, दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून भाजपनं मात्र या निवडणुकीत […]
आजही राज्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात आजही ५ हजारापेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर, दिवसभरात ६ हजार ७७६ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ […]
दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस
नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आजपासून कोरोना लस टोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचं उद्दिष्टं दिल्ली सरकारने ठेवलं आहे. लस टोचण्यासाठी दिल्लीतील विविध रुग्णालये, नर्सिंग होममधील आरोग्य कर्मचाऱ्यांची आजपासून नोंदणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसीची साठवणूक करण्याची तयारीही दिल्ली सरकारने केली आहे. […]
राज्यसरकारचा रक्तपेढ्यांना इशारा; प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास…
मुंबई : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास […]