नागपूर, नाशिकनंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट

नागपूर, नाशिकनंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिक नंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ असल्याने औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, औरंगाबाद शहरातील हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनानं घेतला आहे. 17 तारखेपासून म्हणजे बुधवारपासून औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेलमधील पार्सल सुविधा सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता औरंगाबाद शहरातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात शेकडो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

त्याशिवाय गेल्या 11 मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत लॉकडाऊन करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा संपूर्ण जगात एक पर्यटन शहर म्हणून नावलौकिक आहे. या ठिकाणी देशविदेशातून आलेले अनेक पर्यटक भेट द्यायचे. पण कोरोनामुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

मात्र, वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा, वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा मॉल्स, चित्रपटगृहे / नाट्यगृहे, दूध व्रिक्री व पुरवठा इ. हॉटेल, रेस्टॉरंट भाजीपाला विक्री व पुरवठा सर्व खाजगी कार्यालये/ आस्थापना, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आदी गोष्टी सुरु राहणार आहेत.