गरजूंना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा; आनंद महिंद्राची राज्यआणि केंद्रसरकारला विनंती
कोरोना इम्पॅक्ट

गरजूंना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा; आनंद महिंद्राची राज्यआणि केंद्रसरकारला विनंती

मुंबई : देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. अशातच महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थितीत गंभीर होत चालली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावावर काळजी व्यक्त करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे विशेष विनंती केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम गरजूंना प्राधान्य द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी गरजेनुसार कोरोनाची लस देण्यात यावी. त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्यात याव्यात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. या वेळी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी जेणेकरुन कमीत कमी लोकांमध्ये संक्रमण होऊ शकेल.

ट्वीट करत आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विनंती केली आहे. “सध्या देशात असलेल्या कोरोनाच्या संख्येपैकी अर्धे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे राज्य देशाच्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. या राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागल्यास आर्थिक स्थिती आणखी दुर्बल होऊन जाईल.” या आनंद महिंदा यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टॅग केलं आहे.”

तसेच, “कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या कामात वेग घेणं गरजेचं आहे. आपण असं नाही केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. गेल्या आठवड्यात उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यामध्ये लसीकरण सेंटरची सुरुवात करण्याची परवानगी द्यावी.” असंही आनंद महिंदा आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हंटल आहे.

आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. आनंद महिंद्राच्या या पोस्टवर ट्विटर वापरकर्त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही बरोबर आहात. महाराष्ट्राकडे यावेळी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊनच कोरोनाला पराभूत करू शकतो.”

तर “अशा वेळी कोरोनाची लस प्रथम गरजूंना दिली जाणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना या प्रकरणात एकत्रितपणे काम करावे लागेल.” असे दुसर्या युजरने म्हंटले आहे. तर त्याचवेळी “तुम्ही नक्कीच म्हणता ते बरोबर आहे. आम्हाला याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.” अशी प्रतिक्रियाही एका युजरने दिली आहे. त्यामुळे आता थेट आनंद महिंद्रा यांनीच विनंती केल्याने केंद्र सरकार आणि राज्यसरकार यावर काय निर्णय घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.