सिडनी : बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणारे अनिल कपूर यांनी आर्थिक अडचणींमुळे काही नको असलेले चित्रपटसुद्धा साइन करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा खुलासा खुद्द अनिल कपूर यांनी केला आहे. करिअरमध्ये त्यांनी केवळ चांगल्या भूमिकांमुळे किंवा पटकथेमुळे चित्रपट स्वीकारले नाहीत तर अर्थिक अडचणींमुळेही चित्रपट स्वीकारले असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर म्हणाले, मी हे केलं, खरं तर, मी त्या चित्रपटांची नावंसुद्धा सांगू शकतो. अंदाज, हिर रांझा, रूप की रानी चोरों का राजा या चित्रपटांनंतर माझं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं होतं. आम्ही सगळ्यांनी जे करायला पाहिजे होते ते केले, आणि हे मान्य करण्यात मला काही ही वाटत नाही. मी आणि माझं कुटूंब भाग्यवान आहोत की तो काळ आता गेला आणि त्यानंतर आमची परिस्थिती तेव्हासारखी राहिली नाही.
ते पुढे म्हणाले, जर आमच्या नशिबाने यु टर्न घेतला आणि पुन्हा एकदा वाईट दिवसांचा आम्हाला सामना करावा लागला तर मी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी दोनदा विचार करणार नाही.