कंगना रानौत ट्वीटरला ठोकणार रामराम; कारण….
मनोरंजन

कंगना रानौत ट्वीटरला ठोकणार रामराम; कारण….

अभिनेत्री कंगना रानौत गेल्या काही महिन्यांपासून ट्वीटरवर खूपच चर्चेत आहे. असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर कंगना आपले मत मांडत नाही. ट्विटरवर आपली मते परखडपणे मांडत असते. मात्र आता कंगना ट्वीटर ला रामराम ठोकणार आहे, हो खुद्द कंगनानेच ट्वीटरला रामराम ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र सरकारसोबतचा तिच्या शाब्दिक चकमकी, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण, आणि आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटनी वादही ओढवून घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता मात्र कंगनाची टिवटिव थांबणार आहे. होय, ट्विटरवर व्यक्त होणारी कंगना आता ट्विटरला रामराम ठोकणार आहे. ”ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे,’ असे ट्विट तिने केले. खरंतर कंगनाचे ट्विटरवर 30 लाखांवर फॉलोअर्स आहेत. कंगनाने ट्विटरला रामराम ठोकण्याच्या निर्णयामुळे या फॉलोअर्सची निराशा होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनावरील कंगनाच्या बेताल ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी व पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत ट्विट केले होते. तिच्या या ट्विटला विरोध करत कंगनाने ट्विटचा भडीमार केला होता. थेट आंदोलनकर्त्या शेतकºयांना दहशतवादी म्हटले होते. यानंतर ट्विटरने कारवाई करत तिचे काही वादग्रस्त ट्विट डिलीट केले होते.