ट्विट करत कंगनाने पुन्हा साधला दिलजीतवर निशाणा, आता प्रियंकालाही लगावला टोला
मनोरंजन

ट्विट करत कंगनाने पुन्हा साधला दिलजीतवर निशाणा, आता प्रियंकालाही लगावला टोला

नवी दिल्ली : ”प्रिय दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा जर खरंच शेतकऱ्यांची चिंता असेल, जर खरंच आपल्या मातांचा सन्मान-आदर करत असाल तर ऐका कृषी विधेयक काय आहे! की फक्त आपल्या मातांचा, बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे? वाह रे दुनिया वाह…” असे ट्विट् करत अभिनेत्री कंगना रानौतने पुन्हा दिलजीत दोसांज वर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रावरदेखील ट्विटरवरून निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाने कृषी विधेयकारवरून अनेक ट्विट्स पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ट्विटमधून कृषी विधेयक समजावण्याचा प्रयत्न केलाय. कंगना ट्विटरवर एक ट्विट रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये यूजरने दिलजीत दोसांज आणि एमी विर्कला टॅग करत लिहिले की, कम्युनिस्ट्स आपल्या मातांचा आणि बहिणींचा वापर राजकीय हितांच्या शोषणासाठी करत आहेत. हे लोक जे पोस्टर्स घेऊन आहेत त्यातील अनेक लोकांना दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झाली आहे. हे कृषी विधेयकाशी संबंधित नाहीये. तुम्ही या विरोधात बोलणार का? नाही, कारण तू सुद्धा याचाच भाग आहे.”

त्यानंतर, ”अडचण केवळ हे लोक नाहीत जे त्यांचा सपोर्ट करत आहेत आणि कृषी विधेयकाला विरोध करत आहेत. या सर्वांना हे माहीत आहे की, हे कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचं आहे तरी सुद्धा हे लोक आपल्या फायद्यासाठी निष्पाप शेतकऱ्यांना हिंसा, द्वेष आणि भारत बंदसाठी भडकवत आहेत.” असे ट्विट करत कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

कंगनाने आणखी एका ट्विट करत लिहिले आहे की, ”शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भडकवण्यावर लेफ्ट मीडिया दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रासारख्या लोकांची वाह वाह करत राहणार, प्रो इस्लामिस्ट आणि भारत विरोधी फिल्म इंडस्ट्री आणि ब्रॅंन्ड्स त्यांच्यासाठी भरपूर ऑफर्स देतील. समस्या ही आहे की, पूर्ण सिस्टीम अशाप्रकारे तयार झालं आहे की, भारत विरोधी लोक वाढावे आणि या करप्ट सिस्टीम विरोधात फार कमी लोक आहेत. मला विश्वास आहे की चांगल्या आणि वाईटाच्या लढ्यात जादू होईल, वाईट गोष्टी सशक्त झाल्या आहेत.” असेही तिने म्हंटले आहे.