ज्या गोदी मीडिया ने तबलिगींना कोरोना पसरविण्यासाठी धरले जबाबदार; तेच आता शेतकऱ्यांना….
देश बातमी

ज्या गोदी मीडिया ने तबलिगींना कोरोना पसरविण्यासाठी धरले जबाबदार; तेच आता शेतकऱ्यांना….

नवी दिल्ली : ज्या गोदी मीडिया ने तबलिगी जमातीला कोरोना पसरविण्यासाठी जबाबदार धरले होते. तीच गोदी मीडिया आता शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत असल्याची टीका वरिष्ठ हिंदी पत्रकार ओम थानवी यांनी केली आहे, त्यांनी ट्वीट करत माध्यमांवर टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

थानवी म्हणतात, गोदी मीडिया ने तबलीगींच्या त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरून त्यांच्या कोरोना पसरविण्यात आल्याचा ठपका ठेवत त्यांना कोरोना पसरविल्याचा आरोप करत त्यांना गुन्हेगार ठरवले होते. मात्र न्यायालयाने सहभागी तबलिगींना मात्र निर्दोष असल्याचे सांगितले होते.

तीच माध्यमे आता त्याच शैलीत शेतकरी आंदोलनावर ताव दाखवत असून शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांना नक्सली, खालिस्तानी, देशद्रोही ठरवत असल्याचे थानवी यांनी म्हटले आहे. ही प्रोपोगंडा चावणारी माध्यमे असल्याचेही थानवी यांनी म्हटले आहे.