राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
देश बातमी

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काल(ता. २०) गुरूवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांच्या सुटका केली जावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा स्वीकार करावा आणि राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची शिक्षा माफ करण्याचा आणि त्यांच्या तत्काळ सुटकेसाठी आदेश द्यावा, असे स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, तामिळनाडू मधील बहुतांश राजकीय पक्ष देखील सर्व सात आरोपींच्या तत्काळ सुटकेची मागणी करत आहेत. एवढंच नाही तर तामिळनाडूच्या जनतेची देखील अशीच इच्छा आहे. या सात जणांनी मागील तीन दशकात बऱ्याच यातना सहन केल्या आहेत. असं देखील पत्रात म्हटलं आहे. नलिनी श्रीहरन, मुरुगन, संथन, एजी पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि पी. रविचंद्रन हे सातजण राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी आहेत.

दरम्यान, राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारीवल याची काल ३० दिवसांसाठीची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे.