जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी ममता बॅनर्जींचा हल्लाबोल; म्हणाल्या…
राजकारण

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी ममता बॅनर्जींचा हल्लाबोल; म्हणाल्या…

नवी दिल्ली : माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का?’ असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या ताफ्यावर कोलकाता दौर्‍यादरम्यान दगडफेक करण्यात आली. या दगडफेक प्रकरणावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप केला आहे. तसेच, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर दुसरीकडे, जे.पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांनी हे सगळं नाटक आहे. असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच “देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ कोणीही पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे” असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे.

त्याचबरोबर, “त्यांनी माध्यमांनाही विकत घेतलं आहेते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि माध्यमांकडे पाठवत आहेत. माध्यमांकडून हे व्हिडिओ दिवसभर चालवले जात आहेत.” असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच, नवीन संसद भवनची आता काहीच गरज नव्हती. असे म्हणत त्यांनी नवीन संसद भवनच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. तर हा पैसा शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.

त्यानंतर त्यांनी पीएम केअर फंडचं काय झालं. या फंडाचं ऑडिट का झालं नाही?, असा सवाल विचारत ममतांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. “देशातील संघराज्याचा ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्रातील सरकारने विविध सरकारी यंत्रणांचा उपयोग केला” असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. यासोबतच कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला ‘पीएम केअर्स फंड’मधील पैसा कुठे गेला असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच केंद्रातील सरकारच्या इशाऱ्यावर राज्य सरकार चालणार नाही असं ही म्हटलं होतं.