ममता बॅनर्जी यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली; बाबुल सुप्रियो यांची टीका
राजकारण

ममता बॅनर्जी यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली; बाबुल सुप्रियो यांची टीका

पश्चिम बंगाल : बंगालमधील वातावरणाला आता बदलावं लागेल, ममता बॅनर्जी देवांचीही वाटणी करू इच्छित आहे. त्यांनी संघराज्य व्यवस्थेची हत्या केली आहे, अशा शब्दात केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावर तापलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंडिया टुडे कॉन्क्लेव ईस्ट २०२१ च्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ते बोलताना ते म्हणाले की, ”ममता बॅनर्जींचं भविष्य यावेळी जनता ठरवणार आहे. २०२१ मध्ये काय होतं, ते आपण सर्वजण पाहणारच आहोत. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत, एक खरा राष्ट्रीय पक्ष आहोत, आमच्याकडे महान नेते आहेत, आमच्याकडे चांगेल संख्याबळ आहे जे बंगालच्या विकासाचा मार्ग दाखवतात. तृणमूल काँग्रेस काय आहे? केवळ नावात ऑल इंडिया लावल्याने राष्ट्रीय पार्टी बनत नाही. या वस्तूस्थितीपासून ते पळण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना माहिती आहे की आज बंगालला काय हवं आहे. बंगालला एक स्वच्छ सरकार हवं आहे.”

मी ममता बॅनर्जींना सांगू इच्छित आहे की, एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही चांगल्या भाषेचा वापर केला पाहिजे आणि असं काही बोललं नाही पाहिजे की जे खोटं आहे. ममता बॅनर्जी स्वत: घाबरल्या असल्याने त्या सतत म्हणत आहेत की, जो डर गया वो मर गया…यावरून त्यांच्या आतील भीती दिसते. त्यांनी बंगालला जे वचन दिलं होतं, त्याच्या बरोबर उलटं केलं आहे. तसेच, पोरीबोर्टन यात्रेबाबत ममता बॅनर्जींनी केलेल्या विधानावरील प्रश्नावर बोलताना बाबुल सुप्रियो म्हणाले, मी अशा कोणत्याही गोष्टीवर उत्तर कसं देऊ शकतो जी खोटी आहे. असंही बाबुल सुप्रियो यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.