हिमाचल प्रदेश : “मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकाराचे रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला कोरोनासारख्या संकटापासून वाचवलं,” असे वक्तव्य हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी या साथीच्या संकटाला तोंड दिलं आहे ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं, असंही भारद्वाज यांनी म्हंटल आहे. आऊटलूक इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
शिमला येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला याचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी स्मरण केलं पाहिजे, असंही भारद्वाज म्हणाले.
जगभरामध्ये करोनाची लस बनवणाऱ्या सर्व देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. आता जगभरातील इतर देश भारताप्रमाणे दोन लसी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून भारताकडून लसीसंदर्भात मदत मागत आहेत. लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झालीय. त्यामुळेच ते शिवाचा अवतार आहेत, असा दावाही भारद्वाज यांनी केलाय. इतकचं नाही तर पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच भारतात कोरोना मृत्यूदर कमी आहे. असेही भारद्वाज म्हंटल आहे.