खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान
राजकारण

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान

पुणे : खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे हा दिवंगत पंतप्रधान व राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान असून, लोकशाही संसदीय मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. देशास शरम वाटावी असे कृत्य मोदी सरकार कडून घडले आहे. यास काळही माफ करणार नाही. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे वतीने खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणारी निंदनीय कृती मोदी सरकारने केल्याचा निषेधपर धरणे कार्यक्रमात ते जगताप बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक भाषण केले. राजीवजींच्या संगणक व मोबाईल क्रांतीमुळेच कोरोना काळात देश तरला व वर्क फ्रॅाम होम होऊ शकले, परंतू त्यांचे नांवे पुर्वीच्या काँग्रेस सरकार काळात सुरू केलेला राष्ट्रीय पुरस्कार मात्र मोदी सरकारने रद्द करून कृतध्नतेची पावतीच दिली असे देखील गोपाळ तिवारी यांनी म्हंटले. मा. महापौर अंकूश काकडे यांनी महापालिकेतदेखील एखादे नाव गल्ली, बोळ वा चौक, रस्त्यास दिलेले नाव बदलण्याचा प्रघात नसल्याचे सांगीतले.

काँग्रेस नेते श्रीरंग चव्हाण पाटील यांनी मोदी सरकारच्या मानसिकतेचेच हे दर्शन असल्याचे सांगितले. शिवसेनेचे संपर्क प्रमूख गजानन थरकूडे यांनी मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वाप्रती अनादर व आकस स्पष्ट करणाऱ्या निंद्य कृतीचा शिवसेने तर्फे निषेध केला. रविंद्र माळवदकर यांनी मेजर ध्यानचंद यांचे नावे स्वतंत्र बजेट उभारून अधिक महत्वपुर्ण पुरस्कार देऊ शकले असते? पण मोदींच्या अहंभावी स्वभावाने मेजर ध्यानचंद पुरस्कार वादातीत करण्याचे पाप भाजपने केले असल्याचे म्हटले. विरोधीपक्ष नेत्या दिपाली धूमाळ, मृणालीनी वाणी, बाबा खान, सुभाष थोरवे(क्रीडा संधटना), निरंजन कुलकर्णी, अर्चना शहा, भारत इंगवले, हमाल पंचायत व रिक्षा पंचायत श्री बाबा आढाव, नितीन पवार यांनी निषेध आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. त्यांचे वतीने ओंकार पवार यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत शिरोळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. पुणे शहर काँग्रेसचे ऊपाध्यक्ष सुर्यकांत मारणे यांनी आभार मानले.

आंदोलनप्रसंगी निषेधाचे फलक, आजपर्यंत दिले गेलेले राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची यादी व राजीव गांधींचे क्रीडा व विकासातील योगदानाविषयी माहीतीचे फलक राजीव गांधी स्मारक समिती तर्फे लावण्यात आले होते. यावेळी अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप, आबा तरवडे, रामचंद्र (भाऊ) शेडगे, भूषण रानभरे, दशरथ पवार, संजय अभंग, धनश्याम निम्हण, विश्वास दिघे, भोला वांजळे, आबा जगताप, सुभाष जेधे, रमेश सोनकांबळे, महेश अंबिके, नितीन पायगूडे, किशोर मारणे, राजू नाणेकर, सुरेश ऊकीरंडे, अशोक काळे, शंकर शिर्के, बाळूशेठ ओझा, शशिकांत बिबवे, ॲड. सचिन अडसूळ, गणेश गोकूळे, गोरख भालेकर, सिध्दार्थ शिंदे, अप्पा बने, राहूल मते, बाबा चोकसे, आशिश गुंजाळ, अजय अनिवसे, देवराज इंदूलकर, संजय कुरकुटे इ या ‘निषेध आंदोलनात’ राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य व काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रगीताने निषेध धरणे आंदोलनाची सांगता झाली.