सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
राजकारण

सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी आज कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल करण्यासाठी सोनिया गांधीना पत्र लिहिणारे ते २३ नेतेठी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत डॉ. मनमोहन सिंह, एके अॅन्टनी, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदर सिंह हुड्डा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत ही नेतेमंडळी असणार आहे. पक्षातील दोन बडे नेते म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधीदेखील या बैठकील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने पक्षातील ५-स्टार संस्कृती सोडली पाहिजे आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्याने मोर्चेबांधणी केली पाहिजे असा सूर त्या २३ नेत्यांच्या पत्रात होता. त्या २३ नेत्यांवर काँग्रेसच्या निष्ठावंतांनी टीका केली होती. पण आज सोनिया गांधी या सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर, येत्या नवीन वर्षात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

तसेच, जानेवारी महिन्यात कॉंग्रेसच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षांतील काही नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहून कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याचे आणि पक्षासाठी नवा अध्यक्ष नेमण्यासाठी आवाहन करणारे पत्र लिहिले होते.